Friday, December 10, 2021

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीची उलाढाल व ३ लाख रोजगार देणाऱ्या नागरी बँका व पत संस्था अमित शाह यांना बंद पाडू देणार नाही :जनतेचा पैसा अधिकाऱ्यांच्या संगममताने लुटणाऱ्या संचालकांवर फौजदारी कारवाई करणार -किशोर तिवारी

 किशोर तिवारी यांचे ११ डिसेंबरच्या यवतमाळ येथील   पत्रकार परिषदेमधील निवेदन 

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीची उलाढाल व ३ लाख रोजगार देणाऱ्या नागरी बँका व पत संस्था अमित शाह  यांना बंद पाडू देणार नाही :जनतेचा पैसा अधिकाऱ्यांच्या संगममताने  लुटणाऱ्या संचालकांवर फौजदारी कारवाई करणार -किशोर तिवारी 

दिनांक ११ डिसेंबर २०२१


सध्या मागील १४ महीने वसुली करू नये असा आदेश काढणाऱ्या व सरकारी बँका प्रमाणे कमीत कमी २ लाख कोटीचे पॅकेज नागरी बँकांना न देता केंद्रामध्ये सहकार खाते उघडल्या बरोबर दररोज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या आदेशाने आर बी आई आपल्या अधिकाराच्या बेफाम दुरुपयोग निर्बंध लावत असुन पहिले मकलापूर अर्बन बँक  त्यानंतर कै बाबाजी दाते महीला अर्बन बँक व आता नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने सुमारे ३ लाख कोटीच्या नागरी सहकारी बँका व पत संस्था यामधील ठेवी झपाट्याने काढण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या व चाकरमान्या पेन्शन धारकांनी आपल्या ठेवी ठेऊन समाजाच्या अंत्योदयाचे आंदोलन लवकरच पडणार असुन हा सगळा ३ लाख कोटीच्यानागरी  सहकारी बँका व पत संस्था यामधील गुजरातच्या खाजगी बँकांना देण्याचा कट मोदी -शहा रचला असुन पीएमसी बँक सुद्धा या अधिवेशनात कायदा करून खाजगी बँकेला देण्याचा अफलातुन प्रयोग करण्यात येत असल्याने महाराष्ट्र शिवसेना या नागरी सहकारी बँका लुटण्याच्या अमित शहा पॅटर्नचा विरोध  यशस्वी होऊ देणार नाही या सर्व ३ लाख रोजगार देणाऱ्या नागरी बँका व पत संस्था व त्यांचे ठेवीदार ग्राहक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार असुन केंद्र सरकारचा हा कट उधळून लाऊ असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी दिला . 
आज टिम्बर  भवन येथे   कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी बैठकीत संवाद साधल्यानंतर त्यांनी आपल्याला बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांच्या विरोधात गंभीर तक्रारी आलेच सांगीतले मात्र हा सर्व गोरखधंदा मागील २ वर्षाच्या कोरोणामूळे वसुली केंद्र सरकारने रोखल्याने आला आहे यावर सरकार गंभीर आहे मात्र  २ वर्षाच्या कोरोणामूळे लॉक डाऊन बुडालेल्या धंद्यांमुळे जो एनपीए वाढला वरून आरबीआई ने निर्बंध लावणे चुकीचे असुन यावर केंद्र सरकारने तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारची पाठपुरावा करणार आहे 
महाराष्ट्रातील कोट्यवधी दलित ,मुस्लिम ,आदीवासी,शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी व जमा पैशाची बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुट केल्याचा तक्रारी सुद्धा महाविकास आघाडी सरकार गंभीरपणे घेणार दिसून यावर विशेष नियंत्रक तसेच महाराष्ट्र पोलीस कडुन एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार व एकाही ठेवीदार वा ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही व यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बँक ग्रस्तांच्या  बैठकीत दिल्याची माहीती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली 
एक वर्षांपूर्वी ज्या बँकेचा  एनपीए फक्त ४ टक्के होता तो एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.१३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. बँकेला ‘ड’दर्जा देण्यात आला हा सर्व प्रकार  बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीने साध्य यावर  सारे गप्प का होते हा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांचा यांच्या अनेक तक्रारी आरबीआई  व जिल्हा उपनिबंधकांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही,आमच्या कडे भरपुर प्रकरणे प्रलंबीत असून सवड मिळत नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक जिल्हा उपनिबंधकांचा कारभार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे,त्यांची भुमीका बँकेच्या बाजूला असून पिडीतांना अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील इतर शाखांमधूनही तक्रारींचा ओघ वाढला आहे.हा सर्व प्रकार आंधळा दळत आहे व कुत्रे खात आहेत असा असुन यावर एकही भाजपा आमदार मात्र बोलत नसुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे जीवनभर कमाई करून जमविलेले घामाचे पैसे चोरांनी लुटल्यानंतर त्यांचा नाकर्तेपणा पाहण्यासारखा आहे . 
सध्या महाराष्ट्रात अनेक नागरी सहकारी बँका व पत संस्था  बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा लुटीचा  पॅटर्न चालवीत असल्यामुळे त्यांचा एनपीए सुद्धा दाते महिला सहकारी बँके जास्त असुन फक्त ऑडीटर आरबीआय व सहकार खात्यातील चोर अधिकारी यांच्यामुळे दाबून ठेवण्यात येत आहे याचा  पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला . 
====================================================

No comments:

Post a Comment