Sunday, October 30, 2022
महाराष्ट्रातुन मागील दोन महिन्यात २ लाख कोटीचे पाच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास पूर्णपणे भाजपा जबाबदार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी
महाराष्ट्रातुन मागील दोन महिन्यात २ लाख कोटीचे पाच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास पूर्णपणे भाजपा जबाबदार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी
तिवारी म्हणाले की, मिहानमध्ये सुमारे २० लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मागील २० वर्षांपासून करीत आहेत. मात्र, वास्तव एकदम वेगळे आहे. आता केंद्र सरकारच्या पुढाकाराने येत असलेला प्रकल्पही गुजरातमध्ये जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. या अपयशाची जबाबदारी गडकरी-फडणवीस यांनी घ्यावी, असेही तिवारी म्हणाले.
Thursday, September 22, 2022
किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो महीला जमिनीचे पट्टे व घरकुलासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर धडकल्या -३ ऑक्टोबरला पट्टे व घरकुल वाटपासाठी तातडीची बैठक
किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो महीला जमिनीचे पट्टे व घरकुलासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर धडकल्या -३ ऑक्टोबरला पट्टे व घरकुल वाटपासाठी तातडीची बैठक
दिनांक २२ सप्टेंबर २०२२
मागील ३० वर्षापासुन जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न प्रलंबित
यावेळी बोलतांना माजी नगर सेवक वसंतराव रामटेके यांनी या आंबेडकर वस्तीत सरकारी जागेवर मागील ६० वर्षापासुन नझुल जागेवर दलीत व मादगी समाजाचे शेकडो कुटुंब राहत आहे .संपुर्ण चौकशी करून व कायदेशीर बाजु तपासल्यानंतर तसेच नगर परिषदने जमिनीचे पटटे व घरकुल देण्याचा प्रस्ताव दिल्ल्यानंतरही पैसे देत नसल्यामुळे या अतिशय गरीब वंचीत लोकांना त्यांच्या हक्काचे घरकुला पासुन वंचित ठेवतआहे .आम्ही मागील २० वर्षापासुन प्रशासनाचा दारावर चपला घासत आहोत मात्र आम्ह्चे काम फुकटात करण्यास कोणीहीतयार नाही आता आम्हाला भर पावसात रस्त्यावर उपोषण करावे लागत आहे ,आतातरी अधिकाऱ्यांनी जागावे अशी विनंती प्रकाश रामटेके, भाऊराव मेश्राम, मिराबाई खोब्रागडे, सुभद्राबाई काळे, मंगला खोंडे, जगदीश प्रजापती, दत्ता उत्कंडे, चिनय्या अवणुरवर, संतोष रामटेके, पवन मेश्राम यांनी यावेळी केली .
आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत
अति जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज दिलेल्या आश्वासन नुसार येत्या ३ ओक्टोबरला आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत ठेवले तर याला अधिकार्यांच्या नाकर्तेपणा जबाबदार राहणार असा आरोप आदिवासी नेते अंकीत नैताम यांनी यावेळी केला जर सरकारने आम्ह्चे अधिकाराचे घरकुल व जमिनीचे पट्टे दिले नाही तर आम्ही ३ ऑक्टोबर पासुन सुरु सुरु करण्याचा असा गंभीर इशारा यावेळी विशाल मेश्राम, सुधाकर जंगलवार, माया मेश्राम, रमेश आत्राम, रेशमा गेडाम, देवनाथ गेडाम, काशिनाथ उपरे, व्यंकटी सातुरवार,मलय्या अवणुरवार, नरसिंग कुटलवार, अशोक गुम्मडवार, रवि कनकुटंलावार, नरसिंग कुरेवार, राजांना बतलवार हणमंतू अडूरवार, देवाजी रामटेके, समाधान रामटेके, रवि रामटेके, वसंतराव रामटेके, संतोष गेडाम,दशरथ मेश्राम, महेश गेडाम नंदकुमार वड्डे या वंचीत दलीत व मादगी समाजाच्या नागरीकांनी यावेळी दिला .
प्रशासकीय अनागोंदी कारभार व राजरोसपणे सूर असलेला भ्रष्टाचारा समुळ समाप्त करा -किशोर तिवारी
किशोर तिवारी यांनी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची लक्तरे पांढरकवड्याच्या वेशीवर टांगत पोलीस बंदोबस्तात राजरोसपणे सुरु असलेला वरळी मटका ,क्रिकेटचा मटका बंद तात्काळ बंद करणे ,खंडणी व ब्लॅक मेल करून लुटणाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे .चिड्डीमार गॅंग बिनधास्त हैदौस गावात घालत असुन आई बहिणींचे रस्त्यावर फिरणे कधीं झाले आहे .कॉलेज व शाळेच्या रस्तावर गुंड मुलीना त्रास होत आहे मात्र पोलीस २४ तास फक्त वसुली करतात अशा परिस्थितीमध्ये आता जनतेनी कायदा हातात घेण्याची वेळ आली असून जर उपोषण सत्त्याग्रहानंतरही परिस्थिती बदलली नाही तर आम्ही अधिकाऱयांना "बदडा आंदोलन 'सुरु करू असा इशारा किशोर तिवारी यांनी यावेळी दिला .
==============================================
===============================================================
Wednesday, September 7, 2022
विदर्भात मागील तीन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-कीशोर तिवारी १३ सप्टेंबरला राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार
विदर्भात मागील तीन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-कीशोर तिवारी १३ सप्टेंबरला राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार
एकीकडे महाराष्ट्र सरकारने नापीकी पुरबुडी मुळे झालेल्या नुकसानीची वाढीव मोबदला दिला असुन आता मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा सुद्धा केली आहे मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणीत कमी होत नसुन मागील तीन दिवसात ज्या सात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची दुर्देवी घटना समोर आल्या आहेत त्यांची नावे अशी
Monday, September 5, 2022
महाराष्ट्र होईल शेतकरी आत्महत्यामुक्त; शिंदे सरकार स्वीकारणार पंचसूत्री कार्यक्रम- महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र होईल शेतकरी आत्महत्यामुक्त; शिंदे सरकार स्वीकारणार पंचसूत्री कार्यक्रम- महाराष्ट्र टाइम्स
5 Sept 2022, 10:41 am
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनने ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सरकारला सादर केला आहे.
यवतमाळ : विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वसंतराव नाईक शेती ‘स्वावलंबन मिशन’ने सरकारला ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सादर केला. ‘सर्वांत जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम सरकारने लागू करावा,’ अशी मागणी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.
असा आहे सूचना
- लागवडीचा खर्च, शेतीमालाचा भाव, जमीन व पाण्याचे पुनरुज्जीवन, उत्पादकता, बियांचे स्वातंत्र्य
- पीकपद्धती व अन्न, डाळी, तेलबिया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान
- सहज मुबलक पतपुरवठा धोरण
- नुकसानभरपाई, शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना
- प्रशासकीय, राजकीय, सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मूलन
सात दिवसांत १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
२०२१च्या दुष्काळी वर्षात विदर्भात एक हजार १८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आला होत्या. २०२२मध्येही अतिवृष्टी आणि पुरामुळे आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. विदर्भात या वर्षी आठ महिन्यांत एक हजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तर विदर्भात मागील सात दिवसांत १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनने ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सरकारला सादर केला आहे.
जोपर्यंत लागवडी खर्च कमी होत नाही, नवीन विकसित तंत्र, जमिनीचे आरोग्य, पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही, तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही. त्यावर सर्वांत पहिले काम करण्याचे ‘शेतकरी मिशन’ने सुचविले आहे. पीक पद्धती व अन्न, डाळी, तेलबिया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करून सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवठा देणारे धोरण; तसेच सततची नापिकी पुरबुडी, दुष्काळ यासाठी नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे. यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचवणारी पीक विमा योजना तत्काळ लागू करण्याची सूचना ‘शेतकरी मिशन’ने केली आहे. सध्या सुरू असलेला अनियंत्रित प्रशासकीय, राजकीय, सामाजिक भ्रष्टाचारामुळे ग्रामीण विदर्भातील वातावरण बिघडले असून, गावापासून दिल्ली-मुंबईपर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वच स्तराचे अधिकारी-कर्मचारी सरकारी पैशाची लूट करीत आहेत. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक, आध्यत्मिक, सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
Sunday, September 4, 2022
विदर्भमें फिर सुरु हुआ "किसान आत्महत्याका तांडव पर नेता नृत्यमें व्यस्त": चालू वर्ष में रिकॉर्ड १०३६ किसानोंने की आत्महत्या - किसान मिशनने केंद्र व राज्य सरकारको "पंचसूत्री एकीकृत किसान बचाव कार्यक्रम" सौंपा
विदर्भमें फिर सुरु हुआ "किसान आत्महत्याका तांडव पर नेता नृत्यमें व्यस्त": चालू वर्ष में रिकॉर्ड १०३६ किसानोंने की आत्महत्या - किसान मिशनने केंद्र व राज्य सरकारको "पंचसूत्री एकीकृत किसान बचाव कार्यक्रम" सौंपा
दिनांक ५ सितंबर 2022
सम्पूर्ण भारतमें किसान आत्महत्या के लिए कुप्रसिद्ध महाराष्ट्र विदर्भ प्रान्त में इस वर्ष रेकॉर्ड १०३६ किसानोंने रेकॉर्ड मामले सामने आये है। यह जानकारी महाराष्ट्र किसान मिशन के अध्यक्ष किशोर तिवारी ने आज दी। विदर्भ में पिछले सात दिनों में विदर्भमें १८ किसानों की आत्महत्या का मामला सामने आये है, सरकार को सूची सौंपी है, यह इस प्रकार है,
किशोर तिवारी ने खेद व्यक्त किया है कि एक तरफ विदर्भमें "किसान आत्महत्याका तांडव हो रहा है पर सब राजनेता नृत्य करते नजर आ रहे है ,किसी अमीर आदमी के मृत्युपर तुरंत जाँच के आदेश देने वाले या अमीर आदमीके बेटे बुखार पर चिंता करने वाले कोईभी नेता आजतक इन आत्महत्याग्रस्त परिवारोंकी सूद नही ले रहा है पर जिला से तालुका स्तर तक प्रशासन, पुलिस, कृषि, ग्रामीण विकास, स्वास्थ्य और अन्य विभागों का एक भी अधिकारी इन घरों में नहीं पहुंचाहै ,सरकार ने मदद का ऐलान किया, लेकिन एक भी किसान को मदद नहीं मिली, कर्जमाफी का भी लाभ नहीं, सभी की शिकायत है कि उन्हें खाद्य-स्वास्थ्य-शिक्षा सुरक्षा नहीं मिल रही है. किसानों ने किशोर तिवारी से शिकायत की गांव में कोई कृषि सहायक, तलाठी, ग्राम सेवक, स्वास्थ्य कार्यकर्ता, स्कूल शिक्षक नहीं रहते हैं और वे महीने में एक या दो दिन ही आते हैं,हर तरह व्याप्त भारी भ्र्ष्टाचार इस नरसंहार को जबाबदार है।
Monday, January 24, 2022
टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करा किशोर तिवारी यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना यांना साकडे
टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करा किशोर तिवारी यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना यांना साकडे
दिनांक-२४ जानेवारी २०२२
मागील दोन वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील या भागातील आर्थीक स्थिती जेमतेम झाली असुन शेकडो शेतकरी आत्महत्या करीत आहेत आता त्यामध्ये टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी तसेच गाईड यांच्यावर हीच पाळी आहे यावर प्रशासन बघ्याच्या भुमिकेत असुन वातानुकुल कक्षात बसुन कोरोना महामारीचे नियंत्रण करीत आहेत ज्यावेळी समाजाच्या दबावाला शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जातो त्याचवेळी राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी तसेच गाईड यांची होत असलेली उपासमारी टाळण्यासाठी का पाऊले उचलत नाहीत असा सवाल किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे .
मागील आठवड्यात टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करण्याच्या मागणीसाठी आज जिप्सी चालक तसेच गाईड यांनी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांना निवेदन देऊन टिपेश्वरचे पर्यटन सुरु करण्याची मागणी केली होती . गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वर चे अभयारण्य बंद, चालु करण्यात येत असल्यामुळे जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्या वर उपासमारीची पाळी आली आहे. विशेष येथे कार्यरत सर्वच जिप्सी चालक तसेच गाईड्सने कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहे. वास्तविक पाहता गावात सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. टिपेश्वर अभयारण्यात मात्र बाहेरच्या गर्दीच्या तुलनेत मोजकेच नागरीक पर्यटनासाठी येत असतात. असे असतांना पुन्हा येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील जीप्सी चालक तसेच गाईड्सवर उपासमारीची पाळी आली आहे. याव्यतिरीक्त परीसरातील हॉटेल सुध्दा ग्राहक नसल्याने अडचणीत आले आहे. यासंदर्भात आज जीप्सी चालक तसेच गाईड यांनी किशोर तिवारी यांची भेट घेऊन त्यांचेकडे सरकारकडे पाठपुरावा करुन टिपेश्वर अभयारण्य सुरु करण्याची मागणी केली होती यावेळीप्रविन बोलकुंटवार, सतिष जिडेवार, मंगेश मैदपवार, सलमान खान, जावेद शेख, नरेंद्र गेडाम, चंद्रकांत मडावी, संदिप मेश्राम, अश्विन बाक्कमवार, साहील शेख, रिजवान शेख, सुरज सिडाम, सागर यंबडवार, गजानन बुरेवार, गजानन जिइडेवार, पवन चितकुंटलावार, श्रीकांत गड्डमवार, शंकर मरसकोल्हे, महेंद्र आत्राम, राजु मरसकोल्हे, त्रिशुल तोडारनाम, सागर मडावी, क्रिष्णा आडे, बजरंग कुडमेथे, नागेश्वर मेश्राम, मुजुर शेख, शाहरुख खान, रमेश गंगशेटीवार, सुहास शिरपुरकर, इरफान शेख अमोल मडावी उपस्थित होते.
=========================================================================
Monday, January 10, 2022
स्व. डॉ. बद्रीदासजी टावरी यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत भव्य चिकित्सा शिबिर व लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत जनजागृती ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद- श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर चे आयोजन.
स्व. डॉ. बद्रीदासजी टावरी यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत भव्य चिकित्सा शिबिर व लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत जनजागृती ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद- श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर चे आयोजन.
दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी घुईखेड येथे श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर यांचे आयोजन व ग्राम पंचायत घुईखेड, टिटवा, मांजरखेड दानापूर, निमगव्हान, जावरा, सातेफळ, पिंपळखुटा, कोपरा, येरड, सावंगा बु. जवळा, धोत्रा यांचे सहयोगाने श्रीमती कमलाबाई ब.टावरी इंग्लिश स्कूल घुईखेड येथे निशुल्क चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Saturday, January 8, 2022
शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यवतमाळ येथील महीला पोलीस स्टेशन लोहारा येथे ९ जानेवारीला भेट देणार
शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यवतमाळ येथील महीला पोलीस स्टेशन लोहारा येथे ९ जानेवारीला भेट देणार
दिनांक ८ जानेवारी २०२२
महिला सक्षमीकरण याबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे याची दखल सुद्धा सरकारने घेतली आहे .