कापूस ,सोयाबीन ,तूर उत्पादक महाराष्ट्राच्या ९० लाख शेतकऱ्यांना सरकारच्या आयात धोरणामुळे होणाऱ्या गंभीर परिणाम विरुद्ध किशोर तिवारी यांची २२ ऑगस्टला शेतकरी संवाद यात्रा
दिनांक -२१ ऑगस्ट २०२५
शेतकरी संवाद यात्रा चा सकाळचा दौरा
ही यात्रा दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ला केळापूर व घाटंजी भागातील अतिवृष्टी झालेल्या भागात सकाळी ११.००वाजता केळापूर येथे ,सकाळी ११.३०ला मराठीवाकडी,सकाळी ११.४५ला ढोकी रोड,दुपारी ला १२.०० ला टेंभीला व सुसरी ला दुपारी १२.१५ सुन्ना येथे दुपारी १२.३० तसेच कोपा मांडवी येथे दुपारी १२.४५ तर वारा कवठा येथे दुपारी १.०० वाजता पोहचणार आहे त्यानंतर पाटणबोरी ला दुपारी १.३० तर पिंपळखुटी येथे दुपारी २.०० व कोदोरी येथे ,दुपारी २.३० ला , रुढा येथे दुपारी २.४५ ला चनाका येथे दुपारी ३.०० येथे घुबडी ला दुपारी ३.१५ व कारेगाव बंडलला दुपारी ३.३०,अर्ली ला दुपारी ३.४५ यानंतर घाटंजी तालुक्यात गणेरी ला दुपारी ४.०० तर ठाणेगावला दुपारी ४.१५, भिमकुंड सगदा येथे दुपारी ४.३० व मंगीयेथे दुपारी ४.४५,सावरगावला सायंकाळी ५.००ला त्यानंतर रामनगर येथे सायंकाळी ५.१५ तर शरद येथे सायंकाळी ५.४५ व त्यानंतर पारवा येथे सायंकाळी ६.०० व कालेश्वर ला सायंकाळी ६.१५ ,जाबं येथे सायंकाळी ६.४५ त्यानंतर केळापूर तालुक्यातील झुली दहेली तांडा येथे सायंकाळी ७.०० व पहापळ येथे संवाद यात्रेची संपत्ती रात्री ८ वाजता होईल
या दौऱ्यात किशोरभाऊ तिवारी सह सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांची थेट भेट घेऊन अडचणी समजतील ,पूरग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करतील ,शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या समस्या व पीक विमा अडचणी जाणून घेणार,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देणार,पिक कर्ज वाटपाचा गोंधळ , मागील वर्षीच्या अतिवृष्टीची न मिळालेल्या नुकसान भरपाई तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करणार आहेत या दौऱ्यात संबंधित सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन शासन दरबारी मागण्या मांडल्या जाणार आहेत.
-------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment