Thursday, January 21, 2021

कृषी सुधारणा कायदे रद्द करा या मागणीसाठी शेकडो शेतकरी विधवा व शेतकरी दिल्लीला रवाना -पंतप्रधान व कृषीमंत्र्यांना विदर्भाच्या कोरडवाहू शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणार - किशोर तिवारी

कृषी सुधारणा कायदे रद्द करा या मागणीसाठी शेकडो शेतकरी विधवा  व शेतकरी दिल्लीला रवाना -पंतप्रधान व कृषीमंत्र्यांना विदर्भाच्या  कोरडवाहू शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणार - किशोर तिवारी 

दिनांक -२१ जानेवारी २०२१ 

२६ जानेवारीच्या किसान परेड शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदयस आज यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथुन "किसान बचाव यात्रा " काढून निघाले या किसान बचाव यात्रेचे नेतृत्व शेतकरी विधवा अपर्णा मालीकर ,रेखा गुरनुले ,शोभा वाघाडे ,भारती  पवार ,शीला मांडवगडे ,अंजूबाई भुसारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,गजाननराव आष्टेकर ,निलेश जैस्वाल ,रवीभाऊ कुर्हेवार करीत आहेत अशी माहीती या किसान यात्रेचे संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . ग्रँड मराठा फौंडेशन अध्यक्ष रोहीत शेलटकर यांच्या सहकार्याने या किसान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . 

यावेळी किसान यात्रेला हिरवी  झेंडी दाखवितांना संयोजक किशोर तिवारी म्हणाले कि "ज्या कृषी सुधारणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी व कृषी संकटावर २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विषेय पॅकेज देऊन सुरुवात केली होती त्यानंतर खाजगी बाजार समिती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मुभा ,भंडारणं क्षमता नियंत्रण समाप्त करणे ,कार्पोरेट शेती यांचे प्रयोग २०११ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू करून शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट तर सोडा अजून कमी झाले त्यामुळेच महाराष्ट्रात २०१७ व २०१९ मध्ये दोन ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागली हे सत्य समोर असतांना त्याच सुधारणा उत्त्पन्न दुपट्ट करण्याचा नावावर आंदोलन सरकारच्या अंगलट आल्यावरही अट्टाहास करणे हा अनुचित आहे आता कृषी कायदे रद्द करावे ". 

सरकार जो पर्यंत लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी खत रासायनिक सर्व प्रकारचे औषधी ,शेतीमधील सर्व प्रकारची मजुरी यावरील अनुदान सुरु करीत नाही तसेच शेतीमाल हमी भावात शेतकऱ्यांच्या दारावर विकला जात नाही ,मरणासन जमिनीचा पुनर्जीवन होत नाही ,गावामध्ये भंडारणं व्यवस्था ,प्रक्रिया व्यवस्था ,विपणन व्यवस्था निर्मण होत नाही व शेती लागणारा पतपुरवडा सरकारी बँका पंचवार्षिक तत्वावर देत नाही त्याच बरोबर शेतकऱ्यांचे जागतिक पर्यावरण बदल याला धरून हिट जपणारी पीकविमा व्यवस्था सुरु करण्यात येत नाही या बरोबरच देशाच्या १४० कोटी जनतेला लागणारी सर्व डाळी ,सर्व प्रकारचे तेल ,अन्न व जनतेला आव्यश्यक असलेला शेतात निर्माण होणाऱ्या सर्व कृषीमाल याची आयात बंदी करण्यात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढणार नाही असा सल्ला किशोर तिवारी यांनी यावेळी  दिला 

विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा मालीकर यावेळी म्हणाल्या कि ' भारतातील सध्याची शेतीविषयक संकट ही दोन घटकांची निर्मिती आहे: घटते उत्पन्न ओळखणे आणि अपयशी ठरलेले राज्य अपयश; आणि अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम यामुळे खोलवर रुजलेली शेती संकटाची मुळे , मातीची सुपीकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी  कमी  होणे  , लागवडीची वाढती किंमत आणि शेतकर्‍यांना पिकांचा नफा परतावा, वेळोवेळी निविष्ठांमधील असमाधानकारक वाढ आणि मागणीपेक्षाजास्त अतिरिक्त उत्पादन,  सदोष आयातीच्या धोरणांमुळे ओढवणारे कृषी संकट हे सारे मानवनिर्मित असतांना आपले नियोजन कोणासाठी असा सवाल त्यांनी केला . 

हि किसान यात्रा मध्यप्रदेश उत्तर प्रदेश  मधुन प्रवास करीत दिल्ली येथे पोहचणार आहे . ह्या शेतकरी विधवा सर्व दिल्लीच्या सीमेवर भेट देऊन आप आपल्या व्यथा मांडतील , जर पंतप्रधान कृषी मंत्री वेळ दिला तर आम्ही त्यांची भेट घेणार अशी माहिती भारती पवार यांनी दिली . 

===================

No comments:

Post a Comment