Monday, October 19, 2020

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले  शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद 

दिनांक १९ ऑक्टोबर २०२० 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाल्यांनतर आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले त्यापूर्वी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन विचारपुस करीत आहेत मात्र पीकविमा कंपन्यांचे अधिकारी पंचनामे तर सोडा शेतकऱ्यांचे फोनही  नसुन पंचनाम्याचे आदेश देऊनही एकही शेतात प्रशासकीय अधिकारी देशात नसल्याची तक्रार कै वसंतराव शेतकरी स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पर्वा परीसरात दिली .अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी व पंचनामेवाले आता येत नाही असा निराशेचा भावनेतुन सर्व सोयाबीन काढून फेकून दिले असुन आता हरभऱ्याच्या पेरणीसाठी मशागत सुरु केली आहे मात्र हेच अधिकारी १५ दिवसानंतर येऊन तुम्हचे नुकसानच झाले नाही असे अहवाल भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली . 

नुकसान ८० टक्के मस्तवाल अधिकारी म्हणतात फक्त २५ टक्के पिकांचे नुकसान 

यावर्षीचे अवकाळी पावसामुळे आलेले  हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे मात्र हे होत असलेले पिकांचे अभुतपुर्व नुकसान फक्त २५ टक्के पिकातच फटका देणारे असल्याचा पार्थमिक अहवाल कृषी व महसुल शेतकरी विरोधी अधिकारी सरकारला देत आहेत असा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . आज भारताचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ करून कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट द्या 

कोरानामुळेजर  ग्रामीण अर्थव्यवस्था संपुष्टात आली आहे .सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देऊनही नवीन पीककर्ज दिले नाही .अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट देण्याची गरज आहे मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रद्रुष्टि ठेवत असल्याने जर अशी अभूतपूर्व नभूतो न भविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिकांची बरबादी  निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 

सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================

No comments:

Post a Comment